औसा : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभेच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी औसा येथे आले आहेत . महाराष्ट्रात मोदी जवळपास आठ जाहीर प्रचार सभा घेणार आहेत. मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा वर्धा येथे पार पडली त्यानंतर नांदेड आणि आज लातूर येथील औसा मध्ये पार पडली .
सभेला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थित महायुतीची सभा सुरु आहे. या सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर करून विरोधकांना चिमटे काढले. तसेच, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आपण रक्त आटवल्याचे सांगत आपल्या भाषणात धम्माल उडवून दिल्ली.
“येरे येरे पावसा मतांच्या पावसा
शृंगारेंना निडणून देणार आहे लातूरचं औसा
म्हणूनच पाहूत शृंगारेेंच्या नौसा
आणि ओमराजेंना निवडून आण्यासाठी
येरे येरे लवकर पावसा……
आज याठिकाणी उद्धव ठाकरे सुद्धा आले आहेत
म्हणजे, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी आपले वाद मिटवले
कारण, त्यांच्यामध्ये होते रामदास आठवले
अरे तुम्हाला एकत्र आण्यासाठी मी माझं रक्त आटवले
म्हणून शृंगारे आणि रामराजेंना पार्लमेंटमध्ये पाठवले….
अश्या मिश्किल शैलीत रामदास आठवले यांनी आपली कविता सादर केली ,यावेळी भाजपा आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत .