सातारा : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सातारा येथील रिपाइंच्या जिल्हा कार्यकारणी व तालुकाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन मंगळवार (दि.९ एप्रिल )रोजी सकाळी ११ वाजता हॉटेल लेक व्ह्यु येथे करण्यात आले आहे.
नुकतेच ना.केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सूचनेनुसार महायुतीच्या उमेदवारांचे काम करण्याचे ठरले होते. मात्र, अद्याप उमेदवारांनी प्रचार प्रक्रियेत सामावून घेणेबाबत कोणताही संपर्क केलेला नाही. त्यामुळेच पदाधिकाऱ्यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी सांगितले.