मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आघाडीसोबत राहिलेल्या घटक पक्षांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाआघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, प्रहार संघटना आणि शेतकरी कामगार पक्षांनी साथ दिली. त्यामुळे या पक्षांच्या नेत्यांना मंत्रीपद मिळण्याचा संभव आहे. विशेष म्हणजे घटक पक्षांच्या मंत्रीपदांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकसभेत मोठे यश मिळल्यानंतर हे स्पष्ट होत होते की राज्यातील सत्ता देखील भाजप कायम राखणार, मत चाचणीत देखील तसेच दाखवले जात होते. अशी स्थिती होती की आघाडीला पुन्हा विरोधी पक्षांच्या बाकांवर बसावे लागणार. मात्र निकालानंतर गणित फिरली आणि शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस पाठिंबा देणार अशी चिन्ह दिसायला लागली.
पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी आघाडीला दोन्ही निवडणुकीत विनाअट पाठिंबा दर्शविला होता. तर भाजपने अजित पवारांच्या मदतीने सरकार स्थापन केल्यानंतर देखील बच्चू कडू यांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शविला होता. परंतू भाजपने मात्र निकालानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मदतीने राज्यात पुन्हा सरकार स्थापन केले. तर राजू शेट्टी देखील शेतकरी प्रश्नी आघाडीत सामील झाले होते. या घटक पक्षांनी अडचणीच्या काळातही आघाडीची साथ सोडली नाही. त्यामुळे त्यांना याचे फळ मिळण्याची शक्यता असून बच्चू कडू, जयंत पाटील, राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीला आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेकापमुळे आघाडीला अनेक जागांवर फायदाच झाला.
Visit : bahujannama.com