अहमदाबाद: वृत्तसंस्था – पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांच्यावर आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान अनेक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे. हार्दिक पटेल सध्या भूमिगत आहेत. त्यांच्या अनुपस्थित सोशल मीडियावर आपल्या पतीचा मोर्चा सांभाळत पत्नी किंजल यांनी गुजरात सरकार आणि पोलिसांवर अनावश्यक छळ केल्याचा आरोप केला आहे. पाटीदार आरक्षण आंदोलनातून कॉंग्रेसचे युवा नेते बनलेल्या हार्दिक पटेल यांची पत्नी किंजल पटेल यांनी गेल्या काही दिवसांपासून हार्दिकच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून गुजरात सरकार आणि पोलिसांवर आरोप केला आहे. २९जानेवारी रोजी किंजल यांनी ट्विट केले होते की ‘काही दिवसांपूर्वी तुरूंगातून सुटल्यानंतरही हार्दिक घरी पोहोचला नाही’.
त्यांनी पुढे म्हंटले आहे की, अहमदाबाद क्राईम ब्रांच चे अधिकारी आणि पोलीस सारखे सारखे घरी येतात आणि हार्दिक घरी नाही असे सांगितले तरी रात्री १० वाजता देखील घरात जबरदस्ती घुसून झडती घेतात. यापूर्वी देखील किंजल यांनी अप्रत्यक्षरीत्या पोलिसांबाबत विधान केले आहे की, कुणाला तरी मारून टाकणे म्हणजेच आतंकवाद नाही तर एखाद्याला भीती घालून कोपऱ्यात बसवणे हा देखील आतंकवाद आहे. 24 जानेवारीला सोडण्यापूर्वी हार्दिकने ट्विट केले होते की 7 दिवसानंतर आपण हुकूमशाहीपासून मुक्त झालो आहे, मी शेतकरी, तरुण, विद्यार्थी आणि शिक्षण आणि रोजगाराच्या हक्कांबद्दल बोलतो हा माझा काय गुन्हा आहे का ? म्हणून मी निशाण्यावर आहे
आपल्या एका ट्विटमध्ये हार्दिक लिहितो की मी न्याय आणि कायदा व सुव्यवस्थेचा आदर करतो पण कधीकधी इथेही निराशा जाणवते. हार्दिकविरुद्ध मोरबीच्या अहमदाबाद सत्र न्यायालय आणि टँकारा न्यायालयातून वॉरंट जारी करण्यात आले आहेत, पोलिस सातत्याने त्याचा शोध घेत आहेत पण हार्दिक काही दिवस भूमिगत झाला आहे. गेल्या एक महिन्यापासून किंजल पटेल हार्दिकचे ऑफिशिअल ट्वीटर हॅन्डल हाताळत आहेत, ती लिहिते की हार्दिक समाजासाठी किती काम करा, जेव्हा वेळ येते तेव्हा लोक विसरतात. किंजल सांगतात की आम्ही चळवळीतून कोणतेही पैसे मिळवले नाहीत, आपण लक्षाधीश झालो नाही, हार्दिक निर्दोष भावनेने काम करतो पण आज लोक त्याच्या पाठीशी उभे असल्याचे दिसत नाही. ती म्हणते की मौन बसणे हा एक अन्याय आहे, आम्ही मजबूत आहोत आणि आमच्या हक्कांसाठी पूर्ण ताकदीने लढा देत राहू.