मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – इतक्या दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर अखेर राज्यात महाविकासआघाडी सरकार सत्ता स्थापन करणार आहे. अवघ्या तासाभरात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी राज्याबरोबर देशातील अनेक नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीनी देखील या शपथविधीसाठी उपस्थित राहावे यासाठी स्वतः आदित्य ठाकरें आमंत्रण देण्यासाठी दिल्लीला गेले होते. परंतू सोनिया गांधींनी आजच्या या शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळाली आहे.
यासंबंधित सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून सांगितले की, मी आज शपथविधीला उपस्थित राहू शकणार नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. आपण अशा वेळी एकत्र आलो जेव्हा देश भाजपकडून मोठा धोका संभावत होता. परंतू मला दु:ख आहे की, मी आज होणाऱ्या शपथविधीला उपस्थित राहू शकत नाही. परंतू या पत्रातून त्यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
Sonia Gandhi in a letter to Uddhav Thackeray: Shiv Sena,NCP&Congress have come together under quite extraordinary circumstances, at a time when country faces unprecedented threats from BJP. I regret that I'll not be able to be present at the ceremony (oath-taking). #Maharashtra pic.twitter.com/wHs95Y7mV6
— ANI (@ANI) November 28, 2019
आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या २९ व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, त्यांच्याबरोबर महाविकासआघाडीचे एकूण ६ नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई, काँग्रेसकडून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत ते राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
Visit : bahujannama.com