नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी झारखंडच्या चतरा येथे सभेला संबोधित करताना २५-२५ लोकांना बोलावून भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. सलग दुसऱ्यांदा निवडणुका जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. अमित शहा म्हणाले, ‘या १०-१५ हजार लोकांसह आपण जिंकू का, मला ही गणित माहित आहे, मी एक बनिया आहे, मला फसवू नका, आपल्याला एक मार्ग सांगतो, तुम्ही कराल का, प्रत्येकाने आपल्या हातात मोबाइल घ्या आणि आपल्या संबंधातील २५-२५ लोकांना फोन करा आणि कमळ चिन्हावर मत देण्याचे आवाहन करा.’
झारखंड के चुनाव में कांग्रेस और JMM मिलकर चुनाव लड़ रहे हैं।
मैं हेमत सोरेन से पूछना चाहता हूं कि जब झारखंड के युवा अलग राज्य की मांग कर रहे थे, तब कांग्रेस का स्टैंड क्या था?
झारखंड की स्थापना श्रद्धेय अटल जी ने की थी: श्री @AmitShah #JharkhandBoleBJPFirSe pic.twitter.com/ukkFk1qWrz
— BJP (@BJP4India) November 28, 2019
निवडणूक जाहीर सभेला संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, झारखंड निवडणुकीत एका बाजूला भाजपा आहे जी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाच्या सुरक्षा आणि विकासासाठी काम करते. तर दूसऱ्या बाजूने कॉंग्रेस आणि जेएमएम यांची युती आहे, ज्यांनी झारखंडला भ्रष्टाचाराशिवाय काहीच दिले नाही. तसेच, अटलबिहारी वाजपेयी यांनी झारखंडला बनवले, त्यानंतर नरेंद्र मोदी आणि रघुबर दास यांनी राज्याला उभारी देण्याचे काम केले आणि विकासाच्या दिशेने नेले असल्याचे अमित शहा यांनी यावेळी म्हंटले आहे . तसेच जनतेला मत देण्याचे आवाहन करताना शहा म्हणाले की, मतदान करताना अस्थिर सरकारला स्थापन होण्यासाठी मतदान करू करा. कधीकधी अपक्ष राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे आणि दिल्लीत काँग्रेसला कोट्यावधी रुपये पाठवायचे. अस्थिर सरकारमुळे झारखंडचा विकास कधीच झाला नाही. असे सांगत त्यांनी आपल्या बाजूने मतं वळवण्याचा प्रयत्न केला.
झारखंड के चुनाव में कांग्रेस और JMM मिलकर चुनाव लड़ रहे हैं।
मैं हेमत सोरेन से पूछना चाहता हूं कि जब झारखंड के युवा अलग राज्य की मांग कर रहे थे, तब कांग्रेस का स्टैंड क्या था?
झारखंड की स्थापना श्रद्धेय अटल जी ने की थी: श्री @AmitShah #JharkhandBoleBJPFirSe pic.twitter.com/ukkFk1qWrz
— BJP (@BJP4India) November 28, 2019
नक्षलवादाला मुळापासून उपटून फेकू : शाह
काही दिवसांपूर्वी लातेहार येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचा उल्लेख करत शहा म्हणाले की, ‘लातेहारमध्ये चार पोलिस कर्मचारी शहीद झाले, मी या मंचावरून नक्षलवाद्यांना सांगायला आलो आहे की काय जल्लोष करायचा तो करून घ्या, येथे पुन्हा भाजपाचे सरकार स्थापन होणार आहे. आमचे सरकार येताच नक्षलवादाला मुळापासून उपटून काढू आणि नक्षलवादाचे उच्चाटन करू. शाह पुढे म्हणाले की, गेली ७० वर्षे कॉंग्रेस पक्ष अयोध्या प्रकरण चालवू देत नव्हते. हे प्रकरण २०१८ मध्ये पुढे आल्यावर कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल म्हणाले की, २०१९ नंतर देखील हे प्रकरण चालले पाहिजे. पण श्रीरामांची इच्छा काही वेगळीच होती. २०१९ मध्ये मोदी आले आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भव्य राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला. आता भगवान श्रीराम यांच्या जन्मस्थळावर आभाळाला गवसणी घालणारे राम मंदिर बनणार. यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही असे शहांनी सांगितले.
Visit : bahujannama.com