मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईजवळील अरबी समुदात उभारण्यात येणार आहे .परंतु या प्रकल्पाची परवानगी कोण रोखत आहे.आणि का ? परवानगी नसताना सरकारने तीन-तीन वेळा स्मारकाचे भूमिपूजन केलेच कसे ? असा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी बुधवारी विधान परिषदेत सरकारला चांगलेच धारेवर धरले. विरोधकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे कामकाज काही काळासाठी तहकूबहि करण्यात आले .
अधिवेशनादरम्यान शेकापचे जयंत पाटील यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शिवस्मारकाचा प्रश्न उपस्थित केला. शिवस्मारक प्रकल्पाच्या परवानग्या नेमके कोणते अधिकारी नाकारत आहेत. कोणते अधिकारी परवानग्या नसताना निविदा काढत आहेत, याचा खुलासा सरकारने केला पाहिजे. स्मारकाच्या कामात अडथळे येत असताना शिवस्मारक समिती काय काम करीत होती, असा ती बरखास्त करावी ,अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे .
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला धारेवर धरत पर्यावरण खात्याची परवानगी नसताना पंतप्रधानांनी या स्मारकाचे भूमिपूजन केलेच कसे मराठा आंदोलन तीव्र झाल्याने तो दाबण्यासाठी भूमिपूजन उरकण्यात आल्याचा आरोप मुंडे यांनी केला. आंतरराष्ट्रीय शिवस्मारकाच्या समितीचे प्रमुख विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना आठ पानी पत्र लिहिले होते. त्यातही चुकीच्या पद्धतीने स्मारकाच्या कामाचे टेंडर दिल्याचे मान्य केले आहे. हे पत्र आणि आता स्मारकाच्या कामाला कशामुळे स्थगिती मिळाली, याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे. अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली