बहुजननामा ऑनलाईन टीम – सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना नेते दीपक केसरकर यांच्या विरोधात नवीन खेळी खेळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सावंतवाडीचे नगराध्यक्ष आणि दीपक केसरकरांचे कट्टर समर्थक बबन साळगावकर यांनी प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या ईडी प्रकरणावरून घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अशातच शरद पवारांच्या उपस्थितीत साळगावकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता साळगावकर हे आगामी विधानसभेची निवडणूक लढवणार असून त्यांनी थेट केसरकारांना आव्हान दिले आहे. ऐन निवडणुकीत यामुळे आगामी विधानसभा केसरकारांना आपल्याच समर्थकाच्या विरोधात लढवावी लागणार आहे.
राजकीय समीकरण शरद पवारांच्या खेळीने बदलले
विधानसभेची आता घोषणा झाल्यानंतर बीजेपीच सरकार राज्यात यायला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही असे वाटत असतानाच अचानक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव बँक घोटाळ्यात ईडीने घेतले आणि पवार पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आले. ग्रामीण भागात ईडीने केलेल्या या अचानक कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटले आहे. आता राजकीय वर्तुळात या सर्व गोष्टींचा राष्ट्रवादीला मोठा फायदा होणार असल्याची चर्चा सुरु आहे. शरद पवार यांच्याबाबत सर्वच पक्षांकडून चुकीचे होत असल्याचा सूर उमटवला यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पोलिसांच्या विनवणीनंतर पवारांनी बदलला निर्णय
जेव्हा पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो असे शरद पवारांना सांगितले, तेव्हा ते म्हणाले, “एकेकाळी मीही राज्याचा गृह खात्याचा प्रमुख होतो. त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये आणि कायदा सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून मी ईडीकडे जाण्याचा निर्णय रद्द केला. पण या प्रकरणामुळे अनेक ठिकाणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर असलेली मरगळ निघून गेली आहे आणि कर्यकर्ते विधानसभेच्या जोरदार तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे.
Visit : bahujannama.com