मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं ईडी प्रकरणात नाव आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. शरद पवारांच्या ईडी प्रकरणात काँग्रेस, वंचित आघाडी आणि मनसेसह भाजपचा मित्रपक्ष असलेली शिवसेनाही पवारांच्या बाजूने मैदानात उतरली. त्यामुळे सत्ताधारी भाजप मात्र एकटे पडले. विशेष म्हणजे सत्तेतील शिवसेनेने भाजपला साथ देण्याऐवजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना समर्थन दिले.
एकीकडे शरद पवारांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आणि प्रादेशिक पक्ष एकत्र आले. त्यानंतर आता भाजप एकाकी पडला आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे भाजपसमोर नवे आव्हान उभारल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पवारांनी बदलला निर्णय
आज ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय मी तहकूब करतो असे शरद पवार यांनी सांगितले. ईडीच्या बॅकफूटनंतर शरद पवार यांनी सांगितले की मी जबाबदार माणूस आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. कारण महाराष्ट्रतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्न मी पाहिला आहे. परंतू सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ ईडीच्या कार्यालयात जाऊ शकते.
Visit : bahujannama.com