मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर भाजप नेते किरीट सोमय्या घणाघाती हल्ले करत आहे. आपल्या कृतींमुळे आपलाच पक्ष गाळात जातोय, याचं भान त्यांनी ठेवायला हवं. सोमय्यांनी उगाच खोटे आरोप करू नयेत. किरीट सोमय्यांकडे त्यांचा पक्षही गांभीर्यानं पाहत नाही.
खासदार संजय राऊत दिवाळीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधत राज्यातल्या जनतेला शभेच्छा दिल्या. यावेळी ते बोलत होते. तसंच पुढं ते म्हणाले, की गेल्या वर्षभरापासून राज्यावर संकटं येत आहेत. कोरोना, निसर्ग चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, त्यामुळे आलेला पूर, शेतीचं झालेलं नुकसान अशी संकटांची मालिका सुरू आहे. त्याला मुख्यमंत्री धैर्यानं तोंड देत आहेत. पुढील ४ वर्षे ते राज्यातल्या विकासासाठी अविरत काम करतील.
खासदार संजय राऊत यांनी घेतला सोमय्यांचा समाचार
अन्वय नाईक आणि त्यांच्या कुटुंबानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांना जमीन विकल्याची कागदपत्रं सोमय्यांनी पत्रकार परिषदेत दाखवली. ठाकरे आणि वायकर कुटुंबं एकत्र का आली, त्यांचे भागिदारीत असे किती व्यवसाय आहेत, मुख्यमंत्री ठाकरे याची माहिती जनतेला देणार का, अशी प्रश्नांची सरबत्ती सोमय्यांनी पत्रकार परिषदांमधून केली. आम्ही बोलावं असं कोणतंही महान काम सोमय्यांनी केलेलं नाही. जुनी थडगी आम्हालाही उकरता येतात. तशी ती उकरली गेली तर त्या थडग्यांमध्ये तुमचेच सांगाडे जास्त सापडतील.
सरकार पडण्यासाठी अघोरी प्रयत्न झाले; मात्र सरकारला काही झालं नाही. सरकार पडण्यासाठी अघोरी प्रयत्न झाले मात्र सरकारला काही झालं नाही. गेल्या वर्षभरात अनेकदा ऑपरेशन करूनही सरकारला खरचटलं सुद्धा नाही, त्यामुळे विरोधकांनी विधायक कामांकडे लक्ष द्यावे. असा खोचक सल्ला खासदार संजय राऊत यांनी केला.