मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – या नेत्यांनी पक्ष सोडल्याने मला अजिबात त्रास होत नाही किंवा वाईट वाटत नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत याचा तुम्हाला त्रास होता का असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आपल्या भावना मांडल्या. पक्षाला लागलेल्या गळतीवर त्यांनी वक्तव्य केलं आहे.
तु्म्ही ताकद देऊन मोठे केलेले नेते पक्ष सोडून जात आहेत. याचा तुम्हाला त्रास होतो का ? असा प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार म्हणाले, “या नेत्यांनी पक्ष सोडल्याने मला अजिबात त्रास होत नाही किंवा वाईट वाटत नाही. उलट पक्ष सोडताना या नेत्यांनी दिलेल्या कारणांवर मला हसू येत.” असं त्यांनी सांगितलं.
विधानसभेच्या तोंडावर अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी पक्षात सामील झाले. यानंतर आता कार्यकर्त्यांना उर्जा देण्यासाठी आणि त्यांची गोळाबेरीज करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: मैदानात उतरले आहेत. सध्या ते राज्याचा दौरा करत आहेत. यावेळीच त्यांनी पक्ष सोडलेल्या नेत्यांवर भाष्य केलं आहे.
‘लोकांकडून मिळते उर्जा’
आपल्या दौऱ्यावर असताना शरद पवार म्हणतात, “मी जर घरात असेल तर मला अस्वस्थ व्हायला होतं. परंतु लोकांना भेटलं की, मला बरं वाटतं. त्यांच्याकडून मला मोठी उर्जा मिळते.” राष्ट्रवादीच्या गळतीच्या पार्श्वभूमीवर पवारांचा राज्याचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. भाजपच्या रणनीतीला टक्कर देण्यासाठी पवारांनी तयारी सुरु केली आहे.
Visit : bahujannama.com