बहुजननामा ऑनलाईन – केंद्र सरकार सरकारी नोकरीत ३३ वर्ष सेवा बाजवणा-यांना नोकरदारांना सेवानिवृत्ती दिली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय ज्या कर्मचा-यांचे वय जवळपास ६० वर्ष असेल, त्यांचाही यामध्ये समावेश आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाचा फटका सुरक्षा दलाला अधिक बसू शकतो. कारण लष्कर आणि सुरक्षा दलात वयाच्या २२ व्या वर्षीच रुजू करण्यात येते. त्यामुळे ३३ वर्षाची सेवा तो ५५ वर्षातच पूर्ण करेल. सातव्या वेतन आयोगातही याचा उल्लेख केला असल्याचा दावा सरकारने केला आहे.
सेवानिवृतीचे वय घटवण्याच्या निर्णयाने बॅकलॉगची समस्या देखील दूर होईल, त्यामुळे नवीन भरती ही लवकरात लवकर केली जाऊ शकते, त्यासोबतच कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभही कर्मचा-यांना मिळेल, असेही सरकारने सांगितले. या प्रस्तावावर अंतरिम निर्णयावर विचारविनीमय सुरु असल्याची माहिती डीओपीटीच्या सुत्रांनी दिली आहे. जवळपास प्रत्येक विभागातील अधिकारी आणि कर्मचा-यांची यादी तयारी केली जात असल्याची माहितीही समोर आली आहे. तसेच अनेक तरतुदींचा विचार देखील केला जाणार असून अर्थ मंत्रालयाच्या संमतीनंतरच सेवानिवृत्तीचे वय घटवणार असल्याचे समजतें. त्यानंतर लेटरल एन्ट्री स्किम लवकरात लवकर लागू होऊ शकते. या योजनेमध्ये आयएएस, आयपीएसपासून केंद्रीय सरकारच्या सर्व श्रेणीतील नोक-यांचा समावेश आहे.
३१ जानेवारी २०१९ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने सेवानिवृत्त अधिकारी देव शर्माच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान सांगितले होते की, केंद्रीय सुरक्षा दलात सेवानिवृत्तीचे वय हे समान असावे, यासंदर्भात गृह मंत्रालयाने चार महिन्यात उत्तर द्यावे, असे आदेश काढले होते. मात्र यावर अद्यापही कुठलाच निर्णय घेण्यात आला नसून आतापर्यंत केंद्रीय रिजर्व्ह पोलीस दल सीआरपीएफ, भारत-तिबेट सीमा पोलीस आयटीबीपी, सीमा सुरक्षा दल बीएसएफ आणि सशस्त्र दल एसएसबीमध्ये कमांडेटच्या खालील पदावरील जवान ५७ वर्षातच सेवानिवृत्त होतायेत.
Visit : bahujannama.com