नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी असल्याची सध्या कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. पंरतु ग्लोबल इकॉनॉमी या पासून वाचणं खूप अवघड आहे असे अमेरिकन रेटींग एजन्सी जेपी मॉर्गन च्या इंडिया इक्विटी रिसर्चच्या हेडने सांगितले आहे. त्यांच्या मते सरकारकडून इंफ्रावर खर्च वाढवण्याचा फायदा बँक आणि या सेक्टरमधील मोठ्या सरकारी कंपन्यांना मिळणार आहे. अमेरिका-चीन व्यापार युद्धाचाही ग्लोबल इकॉनॉमी आणि ट्रेडवर परिणाम होत आहे. ग्लोबल सप्लाय चैनमध्ये भारताचं योगदान खूपच कमी आहे.
इकॉनॉमिक्स टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत जे पी मॉर्गनचे इंडिया इक्विटी रिसर्च हेड राजेश मॅस्करेनस म्हणाले, “पुढील दोन वर्षात ग्लोबल इकॉनॉमीमध्ये मंदी येण्याची 40 टक्के शक्यता आहे. त्यामुळे जगातील सेंट्रल बँक आता व्याजदरात कपात करत आहेत आणि सरकारी खर्चातही वाढ होत आहे.”
मंदीत फसण्याचे भारताचे चांसेस कमी
भारताच्या अर्थव्यवस्थेत कंजम्प्शन मोठा फॅक्टर आहे. याला गुंतवणुकीने सपोर्ट मिळत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ट्रेडपेक्षाही इंफ्रास्ट्रक्चर खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्हाला नाही वाटत की, भारत मंदीत फसेल. जगात मंदी आली तर त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही होईल. कारण अशात भारताचं एक्सपोर्ट कमी होईल आणि इंपोर्ट वाढेल. यामुळे सरकारच्या खर्चावर परिणाम होईल.
यो गोष्टी भारताच्या फेवरमध्ये
भारतीय मॅक्रो इकनॉमिक डेटा अजूनही मिश्रीत आहे. चांगली गोष्ट ही आहे की, मॅक्रो अर्थव्यवस्थेत स्थिरता आहे. महागाई नियंत्रणात आहे. यामुळे व्याज दर कमी होण्यास मदत होत आहे.
-केंद्र सरकारचं लक्ष आर्थिक शिस्तीवर आहे, याचं कौतुक व्हायला हवं. गेल्या काही तिमाहीत भारताच्या विकासात खूप घट झाली आहे.
– आम्हाला असं वाटतं की, आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहामाहित भारतीय अर्थव्यवस्थेत हळूहळू रिकव्हरी सुरु होणार आहे. मीडियम टर्ममध्ये ही रिकव्हरी खूप मजबूत असू शकते. कारण इकॉनॉमित कपॅसिटी युटीलायजेशन वाढत आहे.
– यामुळे खासगी क्षेत्राकडून गुंतवणूक वाढू शकते. जर भारतात चांगली विदेशी गुंतवणूक झाली आणि सरकारी आक्रमक निर्गुंतवणूकीने तिजोरीची हालत सरकार ठिक करू शकलं तर इन्व्हेस्टमेंट सायकलमध्ये तेजी येऊ शकते.
– गेल्या काही दिवसांत क्रूड ऑइलमध्ये तेजी आली आहे. यावर नजर ठेवायला हवी. जर ही तेजी कायम राहिली तर भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारावर नकारात्मक प्रभाव पडेल.
Visit : bahujannama.com