बहुजननामा ऑनलाईन : भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी नेहमीच नवनवीन सुविधा आणत असते. अशीच आणखी एक खास सुविधा लवकरच प्रवाशांना भेटणार आहे, त्याअंतर्गत तुमच्या मागणीनुसार ट्रेन धावेल. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार वर्षांत रेल्वे मागणीच्या आधारे दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा मार्गावर प्रवासी गाड्या सुरु होणार आहेत. ही ट्रेन वेटिंग लिस्टच्या गोंधळापासून मुक्त होईल. २०२१ पर्यंत डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (डीएफसी) तयार झाल्यानंतर हि सुविधा मिळणार आहे. तसेच, जेव्हा या दोन मार्गांवर डीएफसीचे काम पूर्ण होईल, तेव्हा दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा या विद्यमान गाड्या पूर्णपणे हटवल्या जातील. मग आम्ही मागणीनुसार प्रवासी गाड्या चालविण्यास सक्षम होऊ, असे यादव म्हणाले.
या मार्गावरील गाड्यांची गती ताशी १६० किमी पर्यंत वाढविण्यासाठी यापूर्वी मान्यता देण्यात आली आहे. हे काम येत्या चार वर्षांत पूर्ण होईल. म्हणूनच, येत्या चार वर्षांत वाहतुक व प्रवासी गाड्या मागणीनुसार धावण्यात येतील आणि त्यामुळे आम्ही वाहतुकीच्या गरजा भागवू शकू. पुढील चार वर्षांत या मार्गांवर कोणतीही वेटिंग नसणार आहे.
यादव यांनी सांगितले की, उत्तर-दक्षिण (दिल्ली-चेन्नई), पूर्व-पश्चिम (मुंबई-हावडा) आणि खडगपूर-विजयवाडा समर्पित फ्रेट कॉरिडॉरवर काम सुरू असून येत्या एक वर्षाच्या आत स्थान सर्वेक्षण पूर्ण होईल. ही डीएफसी सुमारे ६००० किमी लांबीच्या असून पुढील १० वर्षात पूर्ण केल्या जातील. हे काम पूर्ण झाल्यावर आमच्याकडे बरीच क्षमता असेल आणि बर्याच गाड्या चालविण्यास आम्ही सक्षम होऊ. यादव यांच्या मते, काळाबरोबर आपल्यात इतकी क्षमता असेल की आपण खाजगी ऑपरेटरदेखील समाविष्ट करू शकू आणि उत्पादन युनिटही कॉर्पोरेट होऊ शकतील. जेणेकरुन १६० किमी प्रति किमी वेगाने चालणारे आधुनिक कोच देशात उपलब्ध होऊ शकतील आणि आम्ही ते निर्यातही करु शकू.