रत्नागिरी : बहुजननामा ऑनलाईन – गेल्या चार वर्षांमध्ये भाजपा सरकारवरील लोकांची विश्वासहर्ता झपाट्याने कमी होत आहे, भाजप मुळे देशाची इभ्रतही धोक्यात आली आहे. आणि ते वाचवायची असेल तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला हाटवून ती वाचवली पाहिजे.असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी केले.
वंचित बहुजन आघाडीतर्फे चंपक मैदानात आयोजित केलेल्या महामेळाव्यात प्रकाश आंबेडकर बोलताना त्यांनी भाजप-सेनेच्या युतीवर जोरदार टीका केली. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानात घुसून केलेल्या हल्ल्याचा नेमका काय परिणाम झाला. हे आजही कुणी सांगायला तयार नाही.त्याविरुद्ध भाजपचे नेते वेगवेगळे दावे करत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची इभ्रत आणि विश्वासार्हता कमी झाली आहे. ती पुन्हा मिळवायची असेल तर भाजपला सत्तेतून हटवा पण तसे करताना जातीच्या आधारे मतदान करू नका तुमच्या साठी लढणाऱ्याना मतदान करा. असे आवाहन आंबेडकरांनी केले.
प्रकाश आंबेडकरानी भाजप सेनेसहित काँग्रेस वरही चोफेर टीका केली.बॅ.नाथ प. प्रा. मधू दंडवते. सुरेश प्रभू या नेत्यांनी कोकणच्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. पण नारायण राणे मुख्यमंत्री होणे हे दुर्दैव आहे, असे ते म्हणले.