नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – भोपाळ मतदार संघातील भाजपची विवादित लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असा दावा केला होता. त्या विधानाची देशभरात चर्चा झाली परंतु भाजपाने हात वर करत हे विधान साध्वीचे वैयक्तिक विधान आहे असे म्हंटले होते. त्यानंतर आता साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आपला सूर बदलत भाजपाची जी भूमिका तीच माझी भूमिका आहे असं सांगितलं. तसेच नथुराम गोडसेच्या विधानावरून त्यांनी माफी मागितली आहे. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची माफी मागत असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
साध्वी प्रज्ञा सिंह यांनी असे म्हंटले आहे कि ,’हे माझं वैयक्तिक मत आहे. मी एका रोड शो दरम्यान जाताना मी हे उत्तर दिलं आहे. माझा हेतू कोणाच्या भावना दुखावने नव्हता जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची मी माफी मागते. गांधीजींनी देशासाठी जे केलं आहे ते विसरता येणार नाही. मी त्यांचा सन्मान करते. मी पक्षाच्या शिस्तीचं पालन करणारी कार्यकर्ता आहे . जी पक्षाची भूमिका आहे तीच भूमिका माझी आहे’ असं म्हटले आहे.
दरम्यान,’ साध्वी प्रज्ञा सिंह बद्दल यांच्या त्या मताशी भाजपा सहमत नाही. आम्ही त्या विधानाचा निषेध करतो. तसेच साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याकडून भाजपा यासंदर्भात खुलासा मागणार असून, त्यांनी आपल्या विधानाची माफी मागावी’ भाजपाचे नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी असं म्हटलं होतं.
Pragya Thakur apologises for 'Godse true patriot' remark, says Mahatma Gandhi's sacrifice cannot be forgotten
Read @ANI Story | https://t.co/tF8eICkppc pic.twitter.com/QqHwLbHodL
— ANI Digital (@ani_digital) May 16, 2019