वाराणसी : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुक अंतिम टप्प्यात असून येत्या १९ मे रोजी शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर राजकीय नेतेमंडळी एकमेकांवर जोरदार चिखलफेक करताना दिसत आहेत .काही दिवसांपूर्वी बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नीवरून मोदींवर जोरदार निशाणा साधला होता. त्यांच्या या विधानाला आता रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वाराणसीयेथील पत्रकार परिषदेत बोलताना असे म्हणाले कि ,मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीची चिंता करू नये. त्यांनी स्वत: लग्न करावं’ असं प्रत्युत्तर रामदास आठवले यांनी मायावतींना दिलं आहे.तसेच उत्तरप्रदेशमधील अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टी आणि मायावती यांच्या बसपावरही टीका केली.
दरम्यान , भाजप सरकार पुन्हा चांगली मते मिळवून सत्तेत येईल आणि या नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदावर बसतील अशा शब्दात रामदास आठवले यांनी विश्वास व्यक्त केला आहे. येत्या १९ मे रोजी लोकसभेसाठी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडणार असून २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.