भोपाळ : बहुजननामा ऑनलाईन – भोपाळ लोकसभा मतदारसंघातुन भाजपतर्फे निवडणुकीच्या रींगणात उतरलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आज पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ”नथुराम गोडसे हा देशभक्त होता,आहे आणि यापुढेही राहिल ”असा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला आहे. नथुरामला दहशतवादी ठरवणाऱ्या लोकांना या निवडणुकीत उत्तर दिलं जाईल असंही साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं आहे.त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपाने भोपाळ लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिली आहे. मात्र उमेदवारी मिळाल्यापासूनच साध्वी प्रज्ञा सिंह या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेच अधिक चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू आपण दिलेल्या शापामुळे झाला होता असे करकरेंबद्दल वादग्रस्त विधान केले होते.
दरम्यान, आज त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा त्यांनी देशभक्त असा उल्लेख केला आहे. ”नथुराम गोडसे हा देशभक्त होता, देशभक्त आहे आणि देशभक्त राहील. जे लोक त्याला दहशतवादी म्हणतात. त्यांनी स्वत:मध्ये एकदा डोकावून पाहावे. या निवडणुकीमधून अशा लोकांना उत्तर दिले पाहिजे असे प्रज्ञा सिंह यांनी म्हटले आहे.
#WATCH BJP Bhopal Lok Sabha Candidate Pragya Singh Thakur says 'Nathuram Godse was a 'deshbhakt', is a 'deshbhakt' and will remain a 'deshbhakt'. People calling him a terrorist should instead look within, such people will be given a befitting reply in these elections pic.twitter.com/4swldCCaHK
— ANI (@ANI) May 16, 2019