मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादामुळे पश्चिम बंगालमधील वातावरण चांगलच तापलं आहे.पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारमागे भाजपचा हात असून पराभव समोर दिसत असल्याने भाजप मुद्दाम आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण करत आहे. येत्या काळात भाजपाने औपचारिक आणीबाणी जाहीर केली तर आश्चर्य वाटायला नको अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून प्रतिक्रिया देत जयंत पाटील म्हणाले की, निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा दंगली घडवत आहे, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. पश्चिम बंगालमध्ये घडलेला हिंसाचार हा भाजपाप्रेरित असल्याचे वेगवेगळ्या पुराव्यांवरून स्पष्ट होते आहे. या सर्व बाबीतुन सत्ताधारी पक्ष काय सिद्ध करत आहे. पंडित विद्यासागर यांच्या पुतळ्याची विटंबना भाजपा कार्यकर्त्यांनी केल्याचे व्हिडियोमध्ये स्पष्ट दिसत आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.
पराभव समोर दिसत असल्याने भाजपा मुद्दाम आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण करत आहे. येत्या काळात भाजपाने औपचारिक आणीबाणी जाहीर केली तर आश्चर्य वाटायला नको.#WestBengalClashes #WestBengal
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 16, 2019