नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – भूपेन हजारिका यांचे पुत्र तेज हजारीका यांनी भारतरत्न पुरस्कार न स्वीकारण्याचे स्पष्ट केले आहे. मोदी सरकारने ईशान्य भारतासाठी नागरीकता संशोधन विधेयकाची तरतूद केली आहे. त्याच्या निषेधार्थ त्यांनी भारतरत्न न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत सरकराने २५ जानेवारीला भारतरत्न पुरस्कार जाहीर केले होते. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, नाना देशमुख आणि भूपेन हजारिका यांना तो पुरस्कार देण्यात आला होता.
डॉ. भूपेन हजारिका हे भारतीय पार्श्वगायक, गीतांचे लेखक, संगीतकार, गायक, कवी, चित्रपट निर्माते होते. ते मूळचे आसाम येथील असून त्यांची ‘सुधाकांता’ या नावाने ओळख होती. त्यांचा 5 नोव्हेंबर २०११ला मुंबई येथे मृत्यू झाला.