मिरज : बहुजननामा ऑनलाईन – मालगाव नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र 166 करीता मिरज तालुक्यातील मालगाव, टाकळी, मिरज ,कळंबी ,भोसे येथील शेतकर्यांनी अधिग्रहित जमीनीचा मोबदला देताना वार्षिक बाजार मूल्य (रेडिरेकनर) च्या चार पट देण्यात यावा. अन्यथा एक इंच ही जमीन देणार नाही. असा इशारा मालगाव परिसरातील शेतकर्यांनी दिला.शेतकर्यांनी सोमवारी आपल्या मागण्यासाठी कळंबी रस्त्यावर आंदोलन केले.
शेतकर्याचा महामार्गास विरोध नाही. तर संपादित जमीन मोबदला देताना शासन आदेशानुसार वार्षिक बाजार मूल्याच्या चार पट मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु सद्या देण्यात येणार्या नोटिसमध्ये महामार्ग लगत जमिनीस बिगरशेती दराने एकरी बाजार मूल्याच्या तीनपटप्रमाणे सरासरी कोटीच्या दरात तर जिरायती बागायती जमिनींना एकरी 60 लाखा पर्यंत दर निश्चित केल्याने. कळंबी येथील शेतकर्याना पाठवलेल्या नोटीसा द्वारे जमीनीच्या दरात तफावत दिसत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शासन निर्णयांच्या नुसार चारपट मोबदला देण्याची मागणी होत आहे.
या मागणी करीता किसान सभा सांगली ,कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कळंबी( ता.मिरज) येथे सकाळी शेतकर्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. कॉ.उमेश देशमुख, कॉ.दिगंबत कांबळे, प्रा. सिद्धार्थ जाधव, किशोर सावंत यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले.