नवी दिल्ली : वृत्तसंस्था- देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विरोध होत असून पाकिस्तानमधून आलेल्या हिंदू निर्वासितांना नागरिकत्व दिल्यानंतर राजस्थानचे गेहलोत सरकार आता सवलतीच्या दराने राहण्यासाठी जागा देणार आहे. गेहलोत सरकारने पाकिस्तानमधून आल्यानंतर भारतात नागरिकत्व देताना १०० हिंदू कुटुंबांना ५० टक्के सवलतीत जमिनीची कागदपत्रे वाटली आहेत. नागरिकत्व देण्याबद्दल राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घोषणा केली असून जयपूरमधील जयपूर विकास प्राधिकरणाने अशा १०० कुटुंबांना ५० टक्के कमी दराने सरकारी जमीन द्यायला सुरुवात केली आहे.
भाजपने ज्या पद्धतीने हिंदू निर्वासितांमध्ये काँग्रेसला खलनायक म्हणून घोषित करत असताना त्यालाच लक्षात घेऊन गेहलोत सरकारने आता पाकिस्तानमधील हिंदू निर्वासितांना स्वतःचे बनवण्यास सुरुवात केली आहे, असे मानले जात आहे.
काँग्रेस नेते यापासून दुर राहिले असताना मात्र जयपूर विकास प्राधिकरणाने त्यांच्या स्तरावर हिंदू निर्वासितांना जमिनीची कागदपत्रे वाटायला सुरुवात केली होती. राजस्थानचे नगरविकास मंत्री शांती धारिवाल यांनी काँग्रेस सरकार त्यांच्या हितासाठी काम करत असून त्यांच्या नावाने राजकारण होत नसल्याचे म्हटले आहे.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा