नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या मानहानीकारक पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊ केला होता. राहुल गांधींच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर पक्षातील जेष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचे अनेक प्रयत्न केले होते. मात्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहायचेच नाही, असं सांगत राहुल निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळे राहुल यांचं मन वळवण्यात काँग्रेसच्या ५१ खासदारांना अपयश आलं आहे.
यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या लोकसभेतील खासदारांची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीला राहुल गांधी उपस्थित होते. यावेळी पक्षाच्या ५१ खासदारांनी राहुल यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. लोकसभा निवडणुकीतील पराभव हा केवळ तुमचा एकट्याचा पराभव नसून ही पक्षाची सामूहिक जबाबदारी असल्याचं सांगत खासदार शशी थरूर आणि मनीष तिवारी यांनी राहुल यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, युवक काँग्रेसच्या सदस्यांनी राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी करत राजीनामा मागे घेण्याचा आग्रह केला आहे. तसेच ‘देशाला राहुल गांधींची गरज आहे’ अशा प्रकारचे फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी राहुल गांधीना अध्यक्षपदी कायम राहण्याची मागणी केली. मात्र राहुल यांनी राजीनाम्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केल आहे.
Sources: In the Congress Parliamentary party meeting chaired by Sonia Gandhi, Rahul Gandhi was determined not to take back his resignation as the Congress President. (Visuals after the conclusion of the meeting) pic.twitter.com/ia7o9AoxnU
— ANI (@ANI) June 26, 2019