नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या ‘संविधान वाचवा’ या मोर्चात राहुल गांधी बोलत होते. ते म्हणाले की, ‘नथुराम गोडसे आणि नरेंद्र मोदी एकाच विचारसरणीवर विश्वास ठेवतात. त्यांच्यात काहीही फरकी नाही. नरेंद्र मोदी यांच्यात हे सांगायची हिम्मत नाही नाही की, ते गोडसेवर विश्वास ठेवतात.’
तसेच तुमच्या लक्षात आले की जेव्हा तुम्ही नरेंद्र मोदींना बेरोजगारी आणि नोकरीबद्दल विचारता तेव्हा ते अचानक लक्ष विचलित करतात. एनआरसी आणि सीएएमुळे नोकऱ्या मिळणार नाहीत. काश्मीरची परिस्थिती आणि आसाम जाळून आमच्या तरुणांना रोजगार मिळणार नाहीये, असेही राहुल म्हणाले.
Rahul Gandhi, Congress in Kalpetta: Nathuram Godse & Narendra Modi believe in the same ideology, there is no difference except Narendra Modi does not have guts to say he believes in Godse. #Kerala pic.twitter.com/7WAZ9HooT5
— ANI (@ANI) January 30, 2020
राहुल पुढे म्हणाले की, ‘भारतीयांना ते भारतीय आहेत हे सिद्ध करायला सांगितले जाते. मी भारतीय आहे हे ठरवण्यासाठी नरेंद्र मोदी कोण आहेत ? कोण भारतीय आहे आणि कोण नाही हे ठरवण्यासाठी परवाना कोणाला दिला आहे ? मला माहित आहे की मी एक भारतीय आहे आणि मला ते सिद्ध करण्याची गरज नाही.’
Kalpetta: Congress leader Rahul Gandhi leads 'Save the Constitution' march in his Lok Sabha constituency Wayanad. #Kerala pic.twitter.com/u9PoyIhWFi
— ANI (@ANI) January 30, 2020