बहुजननामा ऑनलाइन टीम : आज पुलवामा हल्ल्याला 1 वर्ष पुर्ण झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हल्ल्यावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र या हल्लाला वर्ष पुर्ण होत असताना राज ठाकरेंनी ‘जे शहीद झाले, त्यांचं दुर्देव’ असे म्हणत फारसे भाषण टाळले. पुलवामा हल्ल्यात जे लोक जायचे ते गेले. नवं सरकार स्थापन झालं, असे राज ठाकरे औरंगाबादमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना म्हणाले.
त्यावेळी त्या हल्ल्याबाबत आज काय वाटते ?, असा प्रश्न राज ठाकरे यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर आता काय बोलणार त्याच्यावर आता ? जे शहीद झाले त्यांचे दुर्देव. तो हल्ला घडवून आणला आहे, अशी त्यावेळी चर्चा होती तसे काही पुरावे समोर आले होते. जवानांना त्या मार्गानं घेऊन जाऊ नका, अशा सूचना असतानाही तरीही त्याच रस्त्यानं नेण्यात आलं होतं. त्याबद्दल मी प्रश्न विचारले होते,’ असं राज ठाकरे म्हणाले. ‘मला वाटतं जे घडायचं होतं, ते घडलं. जायचे ते लोक गेले. नवीन सरकार बसलं. सगळ्या गोष्टी घडल्या,’ अशा शब्दांत राज यांनी पुलवामातील हल्ल्यावर भाष्य केलं.
"सरकारच्या निर्णयावर टीका केली तर भाजपविरोधी, स्तुती केली तर भाजप समर्थक, मध्य भूमिका म्हणून काही आहे कि नाही?" – @RajThackeray https://t.co/5VjhxwbZ5R
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 11, 2020
पुलवामा हल्ल्याबद्दल राज ठाकरे काय म्हणाले ?
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने एकर स्ट्राइक केला. पण त्यांना चुकीची माहिती दिली गेली. त्यामुळे बॉम्ब जंगलात पडले. त्यामुळे दहशतवादी मेलेच नाही, असा दावा राज ठाकरेंनी केला होता. एअर स्ट्राइकमध्ये दहशतवाद्यांच्या झालेल्या मृत्यूबाबत त्यांनी शंका उपस्थित केली होती. कुठलेही लष्कर हे माहितीच्या आधारावर कारवाई करते. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक केला. पण त्यांना चुकीची माहिती देली गेली. त्यामुळे बॉम्ब जंगलात पडले होते. त्यामुळे दहशतवादी मेले नाही.