बहुजननामा ऑनलाइन टीम : आज 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. या दिवशी प्रेमी आणि प्रेमिका एकमेकांसोबत कायम राहण्याची शपथ घेतात. मात्र, राजधानी पटना मधील बेली रोडवरील भर रस्त्यावर एक घटना घडली. लग्न झालेल्या व्यक्तीला त्याच्या पत्नीने गर्लफ्रेंडसोबत बाईकवर जाताना रंगेहात पकडले. रत्यावरच यांच्यामध्ये भांडणे सुरु झाली. एका बाजूला मैत्रीण तर दुसरीकडे बायको. त्यावेळी पतीची अवस्था खूपच बेकार झाली होती. रस्त्यावरील गोंधळ पाहून पोलिस तेथे पोहोचले आणि पत्नी आणि पतीची भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांसमोर पत्नीने आपल्या पतीवर अनेक गंभीर आरोप केले. पत्नीचा असा आरोप आहे की, तीन वर्षांपूर्वी दोन्ही कुटुंबांनी परवानगीने लग्न केले होते. त्यांना दोन मुले आहेत,परंतु लग्नाच्या तीन वर्षानंतर पतीचे वागणे बोलणे बदलले आणि तो सगळं विसरुन गेला. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी व्हॅलेंटाईन डे वर पत्नी व मुलांना सोडून पती प्रेम व्यक्त करण्यासाठी इको पार्क येथे जात होता. वाहतूक पोलिसांच्या माहितीवरून जेव्हा महिला पोलीस स्टेशनला पोहचली तेव्हा त्याची बोलती बंद झाली.
त्याच वेळी, पतीच्या गर्लफ्रेंडलाही कोणत्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. नवरा-बायकोसह पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिस सध्या तिघांची चौकशी करत आहेत. पत्नीच्या लेखी तक्रारीवरून या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे महिला पोलिस स्टेशनचे म्हणणे आहे. प्रथम दोन्ही पक्षांमध्ये समुपदेशन केले जाईल. जर पती-पत्नी दोघांनीही सामंजस्य करार केला तर ते ठीक आहे, अन्यथा पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला जाईल आणि न्याय कलमांमध्ये कायदेशीर कारवाई केली जाईल.