नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात भारताचे जवळपास ४० जवान शहीद झाले. त्याबाबत देशभरात बरीच उलटसुलट चर्चाही झाली . हा हल्ला होणार असल्याची माहिती सरकारला आधीच होती. तेव्हा सरकारने यासंदर्भात कॅबिनेटची बैठक बोलावली का, डिफेन्सची बैठक घेतली का, घेतली असेल तर कुठल्या उपाययोजना केल्या, हल्ला झाला म्हणजे या माहितीकडेच दुर्लक्ष केले का, असे प्रश्न निर्माण होतात. याबाबतचा खुलासा आरएसएसचे चीफ (सरसंघचालक) मोहन भागवत यांनी करावा, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी नागपूर येथील पत्रकार परिषदेत दिले.
महाराष्ट्रात भाजप-सेना युती आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातच थेट लढत आहे. काँग्रेस हे तिसऱ्या क्रमांकावर असेल , असा दावा आंबेडकर यांनी केला. काँग्रेसचे सध्या आरएसएसकरण होत असून नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले हे डमी उमेदवार आहेत असेही प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली. पुढे बोलताना ते म्हणाले कि , पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्वांचे उत्तर देणार नाहीत. नितीन गडकरी हे पंतप्रधानानंतर भाजपमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जातात. ,त्यामुळे आम्ही त्यांना हा प्रश्न विचारत आहोत. आंबेडकर यांनी पत्रकारांना एक नोट सादर करीत ती वाचून दाखवली. तीत नोट अतिशय अर्जंट असल्याचे लिहिले होते. तसेच काश्मीरमध्ये हल्ला होणार असल्याचे सांगत सैनिकांची ये-जा असते त्याबाबत सुरक्षितता बाळगण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. ही नोट सुरक्षा दलातील सर्व प्रमुखांना आणि सरकारकडेही आली होती, असा दावा त्यांनी केला. या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते राजू लोखंडे, रवि शेंडे, सागर डबरासे, एमआयएमचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.