बहुजननामा ऑनलाइन टीम – कमी पगार आणि अनियमिततेला कंटाळून राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) जळगाव आगारातील मनोज चौधरी ( Manoj Chaudhary) या वाहकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (st-employee-suicide) केली. आत्महत्या करण्यापूर्वी मनोजने चिठ्ठी लिहिली असून, त्यात मराठी माणसांचे ठाकरे सरकार हेच माझ्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख केला आहे. चौधरी यांच्या आत्महत्येनंतर विरोधकांनी ठाकरे सरकारविरोधात टीकास्त्र सोडले आहे.
यावरून माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, पोलिसांनी हिंमत दाखवावी आणि उद्धव ठाकरेवर कलम 306 अंतर्गत गुन्हा st-(police-should-register-
तर अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामीला अटक होऊ शकते, तर एसटीचे वाहक मनोज चौधरी यांच्या आत्महत्याप्रकरणी बेशरम ठाकरे सरकारमधील परिवहनमंत्री अनिल परबना का अटक करत नाही ? मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनाही जबाबदार धरावे असा टोला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
दरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन यांनीही ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मनोज चौधरी हे गेल्या 10 वर्षांपासून ते कार्यरत होते, राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आक्रोश आंदोलन सुरू आहे. कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे मनोज यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. एकीकडे दिवाळीचा सण तोंडावर आला असताना, 4-4 महिने तुम्ही लोकांना पगार देत नाहीत. शेतकऱ्यांना सांगितले की, दिवाळी गोड करू, त्यांनाही कुणी एक रुपया द्यायला तयार नाही अशा शब्दांत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी निशाणा साधला आहे.
काय आहे घटना?
मनोज परिवारासह कुसुंबा येथे वास्तव्याला होता. सोमवारी सकाळी साडेआठ वाजले तरी वरच्या मजल्यावरून खाली आला नाही म्हणून भाऊ त्याला उठवायला गेला असता, त्याने हॉलमध्ये गळफास घेतल्याचे दिसले. शेजारीच त्याने एका वहीच्या पानावर सात आठ ओळींची चिठ्ठी आढळून आली. भाऊ व मित्रांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात आणले, मात्र तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.