यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले, ” सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रांसाठी भाजपनं त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. एव्हढेच नाही तर काँग्रेसने कुणासोबाबत आघाडी करू नये यासाठी देखील भाजपने खोडा घातला आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आप आघाडीसाठी तयार असताना दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांच्यामुळे आघाडी न झाल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे. याशिवाय शिला दीक्षित यांचे पुण्याच्या एका भ्रष्टाचारी नेत्यांशी संबंध असल्याचा आरोप करत प्रकाश आंबेडकरांनी नाव न घेता सुरेश कलमाडी यांच्यावर टीका केली.
सत्तेत येऊ द्या, निवडणूक आयोगालाही जेलची हवा खायला पाठवू
आगामी लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. राजकीय सभा, रॅली आणि प्रचाराला वेग आला आहे. सभेदरम्यान केल्या जाणाऱ्या भाषणांमध्ये विरोधी पक्षांवर टीका केल्या जात आहेत मात्र यवतमाळ येथे बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी थेट निवडणूक आयोगालाच टीकेचे लक्ष्य केले. ‘पुलवामा घटनेवर काही बोलले की निवडणूक आयोग बंदी लावतं. ही यंत्रणा भाजपच्या हातातील बाहुले आहे. आम्हाला सत्तेत येऊ द्या, यांना देखील जेलची हवा खायला पाठवू ‘ असे खळबळजनक विधान आंबेडकर यांनी केले आहे. यवतमाळ- वाशीम मतदार संघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी दिग्रस येथील सभेदरम्यान ते बोलत होते. निवडणूक आयोगाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणं वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांना चांगलंच भोवलं आहे. आंबेडकरांविरोधात यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिग्रज पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.