नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारकडून जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर आता संतापलेल्या पाकिस्तानने भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापार संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. जाणकारांचं म्हणणं आहे की, यामुळे पाकिस्तान पुरता बरबाद होणार आहे. कारण तो कोठेच आपल्या वस्तू विकू शकत नाही. जाणकारांनसुार, व्यापारी संबंध तोडल्याने भारतावर कोणताही परिणाम होणार नाही. याचे कारण असे की, पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसाठी निर्यात बंद केली आहे. याशिवाय पाकिस्तानातून आयात होणाऱ्या सामानांवर 200 टक्के ड्युटी वसूल केली जाते.
‘पाकिस्तानवर होणार वाईट परिणाम’
फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गेनायजेशन (फियो)चे डायरेक्टर जनरल अजय सहाय यांचं म्हणणं आहे की, व्यापारी संबंध तोडल्याने भारताच्या तुलनेत पाकिस्तानवर जास्त परिणाम होईल. कारण भारत पाकिस्तानवर जास्त अवलंबून नाही. मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा न दिल्याने भारत, पाकिस्तानला मोजक्या वस्तू निर्यात करतो. याऐवजी साऊथ आशिया आणि मिडल ईस्टच्या देशांना जास्त निर्यात केली जाते. इंडियन इंस्टिट्युट ऑफ फॉरेन ट्रेडचे प्रोफेसर राकेश मोहन जोशींचं म्हणणं आहे की, पाकिस्तानचा हा निर्णय त्यांच्याच कारभारावर परिणाम करणार आहे.
भारत-पाकमध्ये गेल्या वर्षी झाला 18 हजार कोटींची उलाढाल
आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये भारत पाकदरम्यान जवळपास 18 हजार कोटींची उलाढाल झाली होती. यात भारताची निर्यात 80 टक्के आणि आयात ही केवल 20 टक्के झाली होती. या आर्थिक वर्षात निर्यात 7.4 टक्क्यांनी वाढून 2 अरब डॉलरवर पोचली होती. 2018-19 मध्ये पाकमधून आयात 47 टक्के घटून 5.36 कोटी डॉलर झाली होती. तर भारताची निर्यात 32 टक्के घटून 17.13 कोटी डॉलर होती.
भारताला या वस्तू पाठवतं पाकिस्तान
पाकिस्तानाकडून भारताला 19 प्रमुख उत्पादनांची निर्यात केली जाते. यात प्रामुख्याने ताजी फळे, सीमेंट, ड्राय फ्रूट, मोठ्या प्रमाणात खनिजे आणि ऑरेस, चमडं, अकार्बनिक रसायन, कच्चा कापूस, मसाले, लोकर, रबर उत्पादने, अल्कोहोल पेय, मेडिकल उपकरण, समुद्री सामान, प्लास्टिक आणि खेळाचं सामन या वस्तंचा समावेश आहे. ताज्या फळांमध्ये पेरू, आंबा आणि अननस यांचा समावेश आहे.