बहुजननामा ऑनलाइन – भारत सरकार ने ३७० कलम हटविण्याच्या निर्णयाचे देश भरातून स्वागत करण्यात आले आहे. परंतु या दरम्यान यूपीच्या मुज्जफरनगर भागातील खालौती विधानसभेचे भाजप आमदार विक्रम सैनी यांनी पंतप्रधान आणि मोदी यांना अभिनंदन करत वादग्रस्त विधान केलं होत. त्यांच्या या विधानामुळे ते तोंडघशी पडले आहेत. देशभरातून त्यांच्यावर निंदा केली जात आहे. अशा वेळेस या भाजप नेत्याची अभिनेत्री ऋचा चड्ढा यांनी चांगलीच हजेरी घेतली आहे.
ऋचा चड्डा हिने आपल्या ट्विट मधून सैनी यांना चांगलेच सुनावत लिहिले आहे कि,”‘रेसिस्ट, सेक्सिस्ट, सेक्ससाठी भुकेलेले डायनोसॉर लुप्त झालेले नाहीत, उलट अजून चवताळले आहेत, आपले अधिकांश पुरुष नेते असे का आहेत , ज्यांना आपण घरी चहा चे देखील आमंत्रण देऊ शकत नाही ? यासाठी जायचं होत का कश्मीर मध्ये ? लग्न तर लीगल होतच ना ? ” सैनी यांच्या या वक्तव्यावर देशभरातून विरोध होत आहे, ऋचा चड्डा सोबतच इतर अनेक कलाकार देखील या विरोधात आहेत. अभिनेत्री स्वरा भास्कर ने देखील हि बाब लाज आणण्यासारखी असल्याचे म्हंटले आहे.
झाले असे कि , अमित शहा यांनी राज्यसभेत ३७० कलम मुद्यावर प्रस्ताव सादर करताच , भाजप आमदार विक्रम सैनी यांनी हिंदू – मुस्लिम तरुणांना जम्मू- काश्मीर मधील तरुणींशी विवाह करण्यास सांगितले. ” खालौती विधानसभेचे कार्यकर्ते खूप उत्सुक आहेत ! , जे अविवाहित आहेत, त्यांनी लग्न करू टाका , आता काही एक अडचण नसेल , ” विक्रम सैनी यांनी एका सभे दरम्यान सांगितले कि , ” काश्मीर मध्ये महिलांवर फार अत्याचार होत होता. तिथल्या एखाद्या मुलीने जर उत्तर प्रदेशातील एखाद्या मुला सोबत विवाह केला तर , तिचं नागरिकत्व संपुष्ठात येई. भारताचे नागरिकत्व वेगळे आणि काश्मीर चे वेगळे , म्हणजे एक देश, आणि दोन विधानं कशासाठी ? जे मुस्लिम कार्यकर्ता आहेत, त्यांनी आनंद व्यक्त केला पाहिजे, लग्न तिथे करा गोऱ्या मुलींसोबत , हिंदू – मुस्लिम कोणी असो , सर्वानी आनंद साजरा करायला हवा . “