नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यावर्षी राज्यसभेतील ६८ सीट्स रिक्त होणार असून विरोध पक्षाची ताकद अजूनच कमी होणार आहे. तसेच त्या जागा भरताना होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही सीटसचे नुकसान होऊ शकते. काही राज्यात काँग्रेसची क्षमता कमी असल्याने पक्षाच्या उच्च सदनासाठी होणाऱ्या निवडणुकीत सामील १९ जागांपैकी ९ जागा गमवाव्या लागल्या आहेत. या प्रकारची अडचणी पक्षाच्या प्रियांका गांधी, ज्योतिरादित्य सिंधिया आणि रणदीप सुरजेवाला यांसारख्या मोठ्या नेत्यांना राज्यसभेवर आणण्याचा विचार करत आहे.
काँग्रेसला आपल्या बळावर ९ जागा राखतील असा भरवसा आहे आणि आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने एका किंवा दोनपेक्षा जास्त जागा जिंकू शकतात. पक्षाला त्या राज्यातून सीट्स मिळू शकतात, ज्या राज्यात त्यांची सत्ता आहे. काँग्रेसची सत्ता छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात असून ते सरकारमध्ये भागीदार आहेत. एप्रिल, जून आणि नोव्हेंबरला रिक्त ६८ जागा भरल्यानंतर विरोधी पक्षाची ताकद कमी होऊ शकते. ज्यामुळे सत्ताधारी हळूहळू वरच्या सभागृहात बहुमताच्या दिशेने जाऊ शकेल.
राज्यसभेची ५१ सीटस एप्रिलमध्ये रिक्त होणार असून जूनमध्ये पाच आणि जुलैमध्ये एक आणि नोव्हेंबरमध्ये ११ जागा रिक्त होऊ शकतात. मोतीलाल वोरा, मधुसूदन मिस्त्री, कुमारी शैलजा, दिग्विजय सिंह, बी.के. हरिप्रसाद आणि एम.वी. राजीव गौड़ा यांचा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये समावेश असून त्यांचा कार्यकाळ एप्रिल आणि जूनमध्ये संपणार आहे. यातील वोरा, शैलजा आणि दिग्विजय सिंह यांनी पार्टीकडून परत एकदा उमेदवारी मिळू शकते.