नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकताच राज्य सरकारकडून राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला. या नव्या मंत्रीमंडळात नव्याने पक्षात आलेल्या नव्या नेत्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. याबाबत भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केली आहे.
मागील सरकारमध्ये मंत्रीपदापासून लांब ठेवल्यामुळे एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाने आयात केलेल्या नेत्यांना संधी देणे सुरु केले असून परंतु त्याच वेळेला पक्षातील जुन्या नेत्यांना डावलले आहे. मला आता मंत्रीमंडळात जायला पूर्वीसारखा उत्साह राहिला नसल्याचे खडसे यांनी म्हंटले आहे.
आजमितीला पक्षात अनेक नेते आहेत जे चार-पाच वेळा निवडून आलेले आहेत. तरीसुद्धा त्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे कार्यकर्ते दुःखी आहेत, त्यांचे दुःख सहाजिक आहे.
खडसें मंत्रिपदाबाबत काय म्हणाले ?
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला अवघा तीन महिन्यांचा काळ राहिला आहे. त्यापैकी दीड महिने आचार संहितेत जातील. त्यामुळे जाता-जाता नावापुरतं मंत्रीपद घेण्यात काय अर्थ ?, असा टोलाही त्यांनी लगाविला.