मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून (सोमवार) सुरु झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधीचे हे अधिवेशन शेवटचे असणार आहे. अधिवेशनात महत्त्वाचे मुद्दे मांडत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधक सज्ज झाले आहेत. राज्यातील भाजप सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता सत्ताधाऱ्यांना सत्तेपासून दूर करेल असे विरोधकांनी म्हंटले आहे.
विरोधकांनी म्हंटले आहे कि, सरकार नेहमी अधिवेशन गुंडाळण्यात पटाईत, पण यंदा आम्ही सरकारला उत्तर मागू, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी ठिय्या मांडत ‘शेतकरी उपाशी, सरकार तुपाशी’… अशा घोषणा देण्यात आल्या. अधिवेशनाधी मंत्रिमंडळ विस्तार करत नाराज असलेल्यांना खूश करण्साचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले आहे. तसेच या सरकारवर पूर्वी ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना या सरकारने मंत्री केले. मात्र या सरकारला भ्रष्टाचारासंदर्भात उत्तरे द्यावी लागतील. केवळ सहा मंत्र्यांना काढून चालणार नाही. फडणवीस सरकारमध्ये अनेक मंत्री भ्रष्टाचारी आहेत. या साऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही विरोधकांनी केली आहे.
दरम्यान, तीन आठवडे चालणाऱ्या या पावसाळी अधिवेशनात निवडणूक आधीचे महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असून महत्त्वाचे विधेयक ही मंजूर केले जातील. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन राजकीय घडामोडीचे केंद्र बिंदू ही ठरणार आहे.