नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – भाजप सरकार सतेत आल्यानंतर २०१६ मध्ये जुने चलन बंद करून (नोट बंदी ) करून नवीन चलन व्यवहारात आणण्याची घोषणा भाजप सरकारने केली होती. हे निर्णय आम्लात येण्याआधीच देशातील चलनात १७ लाख ९७ हजार कोटी रूपयांच्या नोटा अस्तित्वात होत्या. पण आता नोटबंदी नंतर रोखीचा व्यवहार कमी होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज देशातील बाजारात २१ लाख ४१ हजार कोटींच्या नोटा अस्तित्वात आल्या आहेत. त्यामुळे भाजप सरकारची नोटबंदी आणि त्यांचे हेतू साफ फसले आहेत.असे नेते सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे.
नोट बंदी करून काळा पैसे बाहेर काढण्याचा हेतु मोदी सरकारचा फसला आहे.सरकारने उलट काळा पैसा पांढरा करण्यासाठीच नोटबंदीचा वापर केला.रोजगाराचे आणि अर्थव्यवस्थेचे कंबरडे या सरकारने मोडले आहे. मोदीनी अर्थव्यवस्थेचे व देशाचे मोठे नुकसान केले आहे. सरकारच्या कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेचाही बोजवारा उडाला आहे. सरकारचा आणखी एक जुमला लोकांच्या समोर ठसठशीतपणे उघडा झाला आहे. असे त्यांनी म्हटले आहे.