बहुजननामा ऑनलाइन टीम – इतर पक्षांतून आमच्याकडे आलेले नेते अतिशय प्रगल्भ आहेत. देशाला राहुल गांधी नाही तर नरेंद्र मोदीच सक्षम नेतृत्व देऊ शकतात (Fadnavis)याची त्यांना खात्री आहे. राज्याच्या राजकारणाची दिशा त्यांना कळते. इतकेच नाही तर सत्ताधारी पक्षांतील अस्वस्थता लक्षात आल्यानेच या पक्षांचे नेते भाजप आमदार फुटणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत. मात्र भाजपातून एकही आमदार फुटणार नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानिमित्त प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री जयकुमार रावल, आशिष शेलार, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे आदी उपस्थित होते.