नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी गोरखपूरचे वकील यांचा मुलगा अवनींद्रची महत्वाची भूमिका आहे. एकुलता एक साक्षीदार मित्राने फक्त मैत्री निभावली नसून आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्वाची कामगिरी केली आहे. निर्भयाच्या मित्राबद्दल धक्कादायक खुलासा झाला आहे.
निर्भयाच्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी लढा देणारा मित्र इतका तुटला होता की त्याला सांभाळायला त्याच्या कुटुंबाला चार वर्ष लागली. कसातरी तो आता त्या धक्क्यातून बाहेर आला असून त्याने तीन वर्षांपूर्वी त्याचे लग्न लावले गेले आहे. आता तो २ वर्षाचा मुलगा आणि पत्नीसह एका खासगी कंपनीत इंजिनियरच्या पदावर परदेशात काम करत आहे. त्याला अजूनही खंत वाटत आहे की, आरोपींना फाशीची शिक्षा झाल्यानंतरही कोणती ना कोणती अडचण येत आहे.
माहितीनुसार १६ डिसेंबर २०१२ च्या रात्री निर्भयाचा बलात्कार झाला तेव्हा तिच्यासोबत तिचा मित्र अवनींद्रही होता. त्या घटनेनंतर अवनींद्रला पूर्णपणे हलवून टाकले. त्याला धक्का बसला. केवळ तो प्रत्यक्षदर्शी असल्यामुळे त्याच्या साक्षीने दोषींना शिक्षा झाली आहे.
बराच काळ अवनींद्र विस्मृतीचे आयुष्य जगले आणि अजूनही तसेच जीवन जगत आहे. घटनेचा उल्लेख होताच वडील भानू प्रकाश पांडेही भावूक होतात. कोणालाही बोलणे आणि ऐकणे सोपे आहे. परंतु जे घडले तेव्हा आमची काय परिस्थिती होती हे आम्ही शब्दांत सांगू शकत नाही. माझ्या मुलाने कसे तरी या वेदनेवर मात केली आहे.