लखनऊ : वृत्तसंस्था – रामपूरचे सपा खासदार आणि पूर्व नगर विकास मंत्री आजम खान यांची अडचण वाढली असून सपा सरकारमध्ये झालेली जल निगम भरती घोटाळ्याचा तपास करणारी एसआयटीने आजम खान यांनाच दोषी मानले आहे. आजम यांच्यावर १२२ सहायक अभियंता, ८५३ अभियंत्यांसह १३०० पद होती. त्यांची भरती प्रक्रिया अनियमितपणे झाल्याचा आरोप आहे. आजम यांच्या विरुद्ध २०१६-१७ मध्ये जल निगमच्या भरती बोर्डाचे चेअरमन राहिले असून १३०० पदांवर भरती करताना गडबड केली गेली असल्याचा आरोप आहे. युपीमध्ये योगी सरकार आल्यानंतर या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवला गेला.
प्रकरण समोर आल्यावर जेई आणि क्लर्कच्या भरतींना रद्द केले गेले होते. या प्रकरणात माजी नगर विकास मंत्री आजम खान यांच्याशिवाय सचिव राहिलेले एसपी सिंह, जल निगमचे माजी एमडी पी.के. आसुदानी, जल निगमचे तत्कालीन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला होता. एसआयटीने सगळ्या अधिकाऱ्यांची खूप चौकशी केली आहे. आता एसआयटीची तपास प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यात आजम खान यांना दोषी मानले गेले आहे. एसआयटीच्या तपास प्रक्रियेत पूर्णपणे दोषी ठरवण्यात आले असून सध्या एसआयटीने आपला तपास पूर्ण करून अहवाल सरकारला सादर केला आहे.
चार वर्षांपूर्वी जागा निघाल्या होत्या-
सपाच्या कारकिर्दीत जल निगममध्ये २०१६ च्या अखेरीस १३०० जागा रिक्त होत्या. यामध्ये १२२ सहाय्यक अभियंता, ८५३ अभियंते, ३३५ लिपिक आणि ३२ स्टेनोग्राफरची भरती करण्यात आली होती. जल निगम विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी यासंदर्भात गडबड केल्याची तक्रार केल्यानंतर चौकशी सुरू झाली. या प्रकरणात सरकारने यापूर्वी १२२ सहायक अभियंत्यांना काढून टाकले असून नंतर हा तपास सरकारने एसआयटीकडे सोपविला. एसपी सिंग हे नुकतेच भाजपमध्ये दाखल झाले आहेत.