मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – चौकीदार आज १५ लाख, निरव मोदी, मल्ल्या, दाऊद, राफेल यावरील मौन सोडेल असं वाटलं होतं. वैज्ञानिकांचा अभिमान आम्हाला आहेच. पण यात तुमचे योगदान काय? अंतराळत एअर स्ट्राईक केल्याचे सांगून निवडणुकींच्या तोंडावर श्रेय लाटू नका म्हणजे झालं. असा टोला धनंजय मुंडे यांनी ट्विटच्या माध्यमातून केले आहे.
बुधवारचा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा ठरला आहे. या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत अंतराळात महाशक्ती झाल्याचे सांगितले आहे. अर्थ ऑर्बिटमध्ये एका लाइव्ह सॅटेलाईटला भारताच्या अँटी सॅटेलाइटने अवघ्या तीन मिनिटांत पाडले. त्यानंतर देशभरातून वैज्ञानिकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
काँग्रेसने वैज्ञानिकाचे अभिनंदनही केले आहे. पण मोदी सरकार हे त्याचे श्रेय घेत असल्याने त्याच्यावर टीका केली आहे. अशातच यावरून राष्ट्रवादीचे नेते धनजंय मुंडे यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. निवडणुकींच्या तोंडावर श्रेय लाटू नका असे मुंडें यांनी ट्विट करत टोला लगावला आहे. मुंडे यांनी डीआरडी ने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन ही केले आहे.
https://twitter.com/dhananjay_munde/status/1110837895022034944