नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गृहमंत्री अमित शाह यांनी कलम 370 च्या मोजक्या तरतूदी लागू राहणार असल्याचं आज राज्यसभेत स्पष्ट केले आहे. कलम 370 हटविण्याची शिफरस करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव गृहमंत्री अमित शहा यांनी सादर केला आहे.
Resolution revoking Article 370 from J&K moved in Rajya Sabha. pic.twitter.com/ayUAqJdb6o
— ANI (@ANI) August 5, 2019
राज्यसभेत विरोधकांचा अभुतपूर्व पहावयास मिळाला आहे. देशाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घोषणा आहे. अमित शाह हे काश्मीरबाबत 3 विधेयक आणि एक ठराव मांडणार आहेत. ही ऐतिहासिक घोषणा मानली जात आहे. मोदी सरकारची दुसरी टर्म 3 ते 4 महिनेच झाले आहेत. मोदी सरकारने हा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी रात्री केक्शन 144 लागू करण्यात आले असून उमर अब्दुला आणि इतर काही नेत्यांना नजरबंद करण्यात आले आहे. विरोधकांनी राज्यसभेत मोठा गोंधळ केला आहे.