मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला असून महाराष्ट्रात महाविकासाआघाडी हे नवे सरकार स्थापन होणार आहे. उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर २९ व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र अजित पवारांकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी केली जात असल्याची चर्चा रंगली होती. परंतू सिल्वर ओकमधून बाहेर पडल्यावर अजित पवारांना याबाबत विचारण्यात आले असता, मला यावर काहीही बोलायचे नाही, असे उत्तर देत त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत बोलणे टाळले.
NCP leader Ajit Pawar: I am not taking oath today. Today six leaders will be taking oath from each party (Shiv Sena, NCP, Congress). The decision on Deputy Chief Minister is yet to be taken by the party. #Maharashtra pic.twitter.com/JS1n3A1aJJ
— ANI (@ANI) November 28, 2019
अजित पवारांनी दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे ते नाराज असल्याचे दिसते आहे. अजित पवारांकडून राष्ट्रवादीचे संख्याबळ पाहता राष्ट्रवादीला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी करण्यात येत आहे.
अजित पवार पुढे म्हणाले की, आज शिवतीर्थावर मुख्यमंत्र्यांसह एकूण ६ नेते मंत्रिपदाची शपथ घेतील. यात शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २ आणि काँग्रेसचे २ नेते असतील. आमच्याकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेतील. तसेच मी आज शपथ घेणार नाही असेही अजित पवार म्हणाले. शिवाय अध्यक्ष पदाची घोषणा आणि विश्वासदर्शक ठराव मांडल्यानंतर पुढील गोष्टी होतील असे देखील अजित पवारांनी सांगितले.
Visit : bahujannama.com