मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. गेल्या तीन चार दिवसापासून आरोप प्रत्यारोपच्या झडणाऱ्या फैऱ्यांमुळे महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. या सर्व घडामोडीचे पडसाद संसदेतही उमटले. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी भाजपसह इतरही काही पक्षाच्या खासदारांनी केली. दरम्यान, भाजपच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत असून आता आमदार रोहित पवारही आखाड्यात उतरल्याचे दिसत आहे. राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर त्यांनी काही ट्विट करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच भाजपवर सडकून टीका केली आहे.
सरकारवर एका पाठोपाठ एक आरोपांच्या फैर्या झाडल्या जात आहे. त्यानंतर राजीनाम्यासाठी होणारी आंदोलने या सर्वांचा विचार केला तर हे सर्व कशासाठी चाललंय आणि कोण करतंय याचा प्रत्येकाला अंदाज आलाच असेल. विरोधी पक्षनेत्यांनी गृहमंत्र्यांनी रुग्णालयात दिलेल्या प्रेस बाईट चे व्हिडिओ ट्विट करून जो केविलवाणा प्रयत्न केला यातून ‘मी पुन्हा येईन’चे स्वप्न अजूनही त्यांच्या मनात जिवंत असल्याचं प्रतीत होतं आहे असे म्हणत रोहित यांनी निशाणा साधला आहे.
सुधीर मुनगंटीवार साहेबांनी गृहमंत्र्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितलं असताना त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर आक्षेप घेतला. पण त्यांनी ४ नोव्हेंबर २०२० रोजी विरोधी पक्षनेत्यांनी दवाखान्यातून डिस्चार्ज घेतानाचे ट्विट केलेले फोटो बघावेत आणि मग आपल्या आक्षेपाचा विचार करावा. महाराष्ट्राच्या हक्कांवर गदा येत असताना जे कधी एकही शब्द बोलले नाही ते मात्र संसदेत राष्ट्रपती राजवटीची भाष्य बोलू लागले आहेत. केवळ राजकीय पतंग न उडवता महाराष्ट्राच्या हिताचं काम केलं तर महाराष्ट्र नक्कीच आपला अभिमान बाळगेल, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. राज्यात विरोधी पक्षनेत्यांनी केलेलं ट्विट, त्याचबरोबर राज्यपालांना भेटून काहींनी राष्ट्रपती राजवटीची केलेली मागणी, संसदेतही राष्ट्रपती राजवटीवरून सुरु असलेला गोंधळ पाहता राज्यातील विरोधीपक्ष सत्तेसाठी किती उतावीळ झालाय, हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं.
सत्य समोर येईपर्यंत असत्य गावभर हिंडून येतं
पदावरून दूर झाल्यानंतरच एखादी व्यक्ती झालेल्या गैरकारभाराबाबत बोलू लागते, म्हणजे गैरकारभार झालाय की पदावरून गेल्याचं दुःख आहे, हा प्रश्नही महत्वाचा आहे. गैरकारभाराबाबत हातात अधिकार असताना काहीही न बोलत नाही मात्र पदावरून हटवताच बेछूट आरोप करत सुटतात, याचा अर्थ काय समजावा? हा अधिकारी दिल्लीला जातो काय, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत सीबीआय चौकशीची मागणी का करतो? तत्पूर्वी ती कोणाला भेटला ? तो स्वतः बोलतोय की कुठली राजकीय शक्ती एखाद्या राजकीय हेतूपोटी या अधिकाऱ्याकडून हे सगळं वदवून घेतेय, अशी शंका निर्माण होत आहे. हि सर्व परिस्थिती पाहिली तर मार्क ट्वेनच्या ‘सत्य समोर येईपर्यंत असत्य गावभर हिंडून येतं’, या वाक्याची प्रचिती येते आणि हा राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न असल्याचा दाट संशय येतो असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
जर अनैतिक मार्गांने सरकार पडत नसेल तर सरकारविषयी जनतेच्या मनात असलेली आपलेपणाची भावना कमी करण्यासाठी सरकारवर बेछूट आरोप करायचे. चौकशीतून सत्य समोर येईलच. परंतु सत्तेसाठी कुठल्या थराला जायचं याचा विचार मात्र विरोधकांनी करावा. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावरून खेळण्यात आला, परंतु त्या ठिकाणीही सत्य समोर आलंच. या प्रकरणीही सत्य समोर येईलच, परंतु जनतेचे मूलभूत या सर्व घडामोडींमध्ये प्रश्न बाजूला पडू नयेत हिच अपेक्षा.
सत्ता गेल्यानंतर मानसिक संतुलन कसे बिघडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस राज्यातील घडामोडींवर काँग्रेसनेही भाष्य केलं आहे. साता मिळ्वण्यासाठीच हा खटाटोप असल्याचं म्हंटल आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रवक्ते डॉ राजू वाघमारे यांनीही विरोधी पक्षनेते यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, पुराव्यानिशी भाजपच्या २२ मंत्र्यांवर आरोप होते.
कोणी राजीनामा दिला?” असा सवाल करत भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर अनिल देशमुख यांनी डिस्चार्ज मिळाल्यानंतर १५ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेतली. मात्र खोटे बोलून संभ्रम तयार करायचा! सत्ता गेल्यानंतर काही माणसांचे मानसिक संतुलन कसे बिघडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे फडणवीस व भाजप नेते कृपा करून तपासून घ्या असं वाघमारे यांनी म्हटलं आहे.