मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळ्यानंतर उष्माघातामुळे 14 जणांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले, खारघर दुर्घटनेत अनेक निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला असून याची जबाबदारी ही शिंदे फडणवीस सरकारची (Shinde Fadnavis Government) असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. कडक उन्हात गर्दी जमवून आपल्याला अनुकूल वातावरण करण्याचा डाव शिंदे-फडणवीस सरकारचा असल्याचा आरोप करत या घटनेची चौकशी ही निवृत्त न्यायाधीशांमार्फत (Inquiry by Retired Judge) करावी अशी मागणी शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) पुढे म्हणाले, पक्षाचं शिबीर उन्हाळ्यात घेताना काळजी घेता, मग या ठिकाणी काळजी का घेतली नाही, असा सवाल त्यांनी केला. या घटनेची चौकशी आता अधिकाऱ्यांच्या समितीकडून (Officers Committee) केली जाणार आहे. अधिकारी कितीही प्रामाणिक असला तरी तो राज्य सरकारच्या विरोधात अहवाल देत नाही. त्यामुळे खारघर घटनेची सत्यता लोकांसमोर येणार नाही. त्यामुळे या घटनेची चौकशी ही निवृत्त न्यायाधीशांकडून केली जावी, असे शरद पवार म्हणाले.
निष्काळजीपणामुळे 40 जवानांनी जीव गमावला
पुलवामा हल्ल्या (Pulwama Attack) बाबत बोलताना शरद पवार म्हणाले, सरकारच्या निष्काळजीपणामुळे पुलवामा येथे 40 जवानांना जीव गमवावा लागला, असा आरोप त्यांनी केला. देशात सत्तेचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरु असून दोन मुलांची भांडणं झाली तर ईडी (ED) मागे लावेल अशी धमकी दिली जात आहे. एवढी ही व्यवस्था घराघरात पोहचली असल्याचे शरद पवार म्हणाले.
कोणी पुढे आलेतर कारवाई केली जाते
अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर खटला भरला गेला. त्यांच्यावर आरोप होता की 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार (Corruption) केला आणि आता आरोपपत्रात सव्वा कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे लिहिले आहे. त्यांच्या शिक्षण व्यवस्थेला एक कोटी रुपयांची देणगी देण्यात आली आहे आणि त्याबाबत त्यांच्यावर खटला दाखल केला. आता भूमिका घेऊन जर कोणी पुढे येत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाते. नवाब मलिक (Nawab Malik) यांची केस किती दिवस पुढे ढकलली जात आहे. राष्ट्रीय पक्षाचा प्रवक्ता आहे म्हणून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप (BJP) सोडली म्हणून त्यांच्या जावयाला तुरुंगात टाकण्यात आलं. कोणावर अन्याय झाला त्याच्या मागे तागदीने उभे राहिले पाहिजे, त्या प्रवृत्ती विरोधात लढावे लागेल. मग त्यासाठी कितीही मोठी किंत द्यावी लागली तरी चालेल, असं शरद पवार म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- NCP Chief Sharad Pawar | sharad pawar allegations on kharghar maharashtra bhushan award and eknath shinde devendra fadanvis
हे देखील वाचा :
Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वानवडी पोलिस स्टेशन – क्रिकेट खेळताना इयत्ता 8 वी तील मुलाचा ह्दयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, उन्हाळी सुट्टीतील दुर्देवी घटना
Maharashtra Prisons Implements New Policy | कारागृहातील शिक्षाधीन पुरुष व महिला बंदी व न्यायाधीन महिला बंद्यांची कारागृहाबाहेरील मुले, नात-नातू व भाऊ -बहीण यांना समक्ष गळा भेट (Video)