बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसने नुकतीच राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदाची घोषणा केली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांची राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मुंबईत राष्ट्रवादीचं नेतृत्व करणार कोण असा प्रश्न होता. पण नवाब मलिक यांचा अनुभव आणि पक्षांबद्दल असणारी निष्ठा पाहून शरद पवार यांनी नवाब मलिक यांची नियुक्ती केली आहे.
सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर नवाब मलिक यांचं नाव अध्यक्षपदासाठी समोर आल. परंतु ,पक्षातील काही नेत्यांनी यांच्या नावाला विरोध केला होता. त्यामुळे ही निवड झाली नव्हती. पण नंतर शरद पवार यांनी नवाब मलिक यांची पक्षाबद्दलची निष्ठा पाहून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. राष्ट्रवादीला मुंबईत आतापर्यंत अपेक्षित असा प्रभाव पाडता आला नाही. पण आता मात्र नवाब मलिक पक्षवाढीसाठी नेमकी काय पाऊलं उचलतात. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.