नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेत राम मंदिराच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. शिवसेनेसह राम मंदिरावर बोलणाऱ्या नेत्यांना त्यांनी अप्रत्यक्ष टोला दिला आहे. मी हात जोडून विनंती करतो रामासाठी, डोळे बंद करून न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा असं मोदी म्हणाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपानिमित्त ते नाशिकमध्ये आले होते. यावेळी जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते.
PM Modi in Nashik, Maharashtra: I am astonished where did these 'bayan bahadur' come from? Why are they creating obstacles? We should trust Supreme Court, the Constitution & judiciary of India. I request these people to trust the judiciary of India, for God's sake. https://t.co/ELgPvP7XB5
— ANI (@ANI) September 19, 2019
नरेंद्र मोदी म्हणाले की, “राम मंदिराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालय प्रकरण ऐकून घेत आहे. हे वाचाळवीर कुठून टपकतात माहीत नाहीत. का ते या प्रकरणांमध्ये अडचणी निर्माण करू पाहत आहेत ? सर्वोच्च न्यायालय, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर आणि न्यायप्रणालीवर आपला विश्वास असायला हवा. या नाशिक पवित्र जमीनीवरून मी वाचाळवीरांना हात जोडून विनंती करतो की, रामासाठी, देवासाठी डोळे बंद करून न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवावा.”
यावेळी बोलताना मोदींनी शेतकऱ्यांचा मु्द्दा, सैनिकांचा मुद्दा, कलम 370 सह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. याच वेळी त्यांनी राम मदिराच्या मुद्द्यावरही आपलं म्हणणं मांडलं. यावेळी मित्रपक्ष शिवसेनेसह विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही त्यांना महाजनादेश यात्रेबद्दल आणि त्यांच्या कामगिरीबद्दल कौतुक केलं.
Visit : bahujannama.com