मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. बुधवारी ते बीडमध्ये असताना त्यांनी आगामी निवडणुकीसाठी बीड जिल्ह्यातील 5 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यानंतर आता मी उमेदवारांची घोषणा करणे चुकीचे आहे आहे असे त्यांनी म्हटले आहे. बीड जिल्ह्यातील उमेदवारांची घोषणा करून चूक केली असं वक्तव्य पवारांनी केलं आहे.
एका मुलाखतीत बोलताना उमेदवारांची यादी जाहीर करून चूक झाल्याचं सांगत शरद पवार म्हणाले, “उमेदवार जाहीर करणं माझी चूक आहे. प्रदेशाध्यक्षाने उमेदवार जाहीर करायला हेवे होते. पण लोकाग्रहास्तव मी उमेदवार जाहीर केले असं पवार म्हणाले. उमेदवारांची घोषणा करणे हे प्रदेशाध्यक्षांचे काम आहे. मात्र, बीड येथील कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आग्रह पाहूनच मी उमेदवारांची घोषणा केल्याचे पवारांनी स्पष्ट केलं. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. शरद पवार सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत.
बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये शरद पवार यांनी परळी विधानसभा मतदार संघातून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, गेवराईमधून विजयसिंह पंडित, केजमधून नमिता मुंदडा, माजलगाव मधून प्रकाश सोळंके, बीडमधून संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी यावेळी घोषीत केली होती. मात्र, त्यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर करू असे म्हटले होते.
Visit : bahujannama.com