लखनऊ : वृत्तसंस्था – गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर प्रदेशात रस्त्यावर नमाज पठण सुरु आहे. सध्या रस्त्यावरील हे नमाज पठण कळीचा मुद्दा ठरताना दिसत आहे. कारण जेव्हापासून रस्त्यावर नमाज पठण सुरु आहे. त्यानंतर याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुत्त्ववादी संघटनांकडून रस्त्यावर हनुमान चालीसा पठण केलं जाताना दिसत आहे. यामुळे यावरून आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.
हा प्रकार पाहता आता ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाने या पार्श्वभूमीवर ठाम भूमिका घेतली आहे. त्यानुसार, जर कोणी रस्त्यावर नमाज पठण करायला आक्षेप घेतल असेल तर रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्यांनी मशिदीत जाऊन प्रार्थना करावी. यानंतर आता ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाने घेतलेल्या भूमिकेचे सर्वच स्तरातून स्वागत होताना दिसत आहे.
रस्त्यावरील सुरु असणाऱ्या या नमाज पठणामुळे त्याच्या विरोधात आंदोलन होण्याची स्थिती निर्माण झाली होती. उत्तर प्रदेशात याआधीही रस्त्यावरील नमाजाचा मुद्दा चर्चेत आला होता. आंदोलनाची स्थिती निर्माण होत असताना या प्रकरणी ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाने जी भूमिका घेतली आहे ती नक्कीच महत्त्वाची आहे.