आझमगढ : बहुजननामा ऑनलाईन – देशातील लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात असून अजून मतदानाचे दोन टप्पे बाकी आहेत त्यात उत्तरप्रदेश ,बिहार ही महत्वाची राज्य आहेत त्यातच उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर जोरदार टीका केली आहे त्या म्हणाल्या कि ,नरेंद्र मोदी यांचे अच्छे दिन संपले असून वाईट दिवस सुरू आहेत उत्तर प्रदेशातील आझमगढ येथील प्रचारसभेत त्या बोलत होत्या .
सपा-बसपा आणि आरएलडीच्या युतीमुळे भाजपा नेत्यांची झोप उडाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या महाआघाडीला वारंवार महामिलावटी म्हणत आहेत. परंतु, मोदीच स्वतः मोठे महामिलावटी आहेत . जसा जसा निकाल जवळ येत आहे तसे महाआघाडीच जिंकण्याची चिन्हे दिसत आहेत पहिल्या पाच टप्प्यांतील निवडणुकांमधून जनमत आपल्या बाजूने असल्याचेही मायावती यावेळी म्हणाल्या.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मतदार मोदींच्या प्रचाराला बळी पडणार नाहीत. कारण आता मोदींचे वाईट दिवस आल्याची टीका मायावती यांनी केली.