मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षणासंदर्भातली राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आणि यंदाचे प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाच्या कायद्यानुसार होणार नाही. सरकारने मतासाठी विद्यार्थ्यांचे राजकारण केले असून मेडिकलच्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाला सरकारच जबाबदार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
पुढे बोलताना मुंडे म्हणाले कि ,भाजप सरकारकडे कोणत्याच गोष्टीचा लाँग टर्म प्लान नाही नुकतेच जाहीर झालेले मराठा आरक्षण असो किंवा त्यांच्या फसलेल्या योजना असोत राज्य सरकारने निवडणुकांच्या अनुषंगाने आरक्षण जाहीर केले मात्र ते न्यायालयात टिकले नाही .मेडिकलच्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाला सरकारच जबाबदार असल्याचेही मुंडे बोलले .
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षणासंदर्भातली राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यावर्षीची प्रक्रिया मराठा आरक्षणाच्या कायद्यानुसार होणार नाही. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशा पसरली आहे.