नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीचा देशातील चौथा टप्पा पार पडला असून आता निवडणूक शेवटच्या टप्प्यात असताना भाजप वरिष्ठ नेते वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध असणारे सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान पदाच्या उमेदवारीत बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले नाही तर त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे चांगला पर्याय ठरू शकतात. असे वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. परंतु हा निर्णय निवडणुकीच्या निकालावर अवलंबून असल्याचेही ते बोलले एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्वामींनी हे भाष्य केले.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, भाजपा पक्षाने लोकसभा निवडणुकीत २३० अथवा २२० जागा जिंकल्या आणि एनडीएच्या मित्रपक्षांना ३० जागा मिळाल्या. तर हा आकडा २५० पर्यंत पोहचेल. तरीपण आम्हाला ३० जागांची गरज असेल, असे त्यांनी सांगितले. या स्थितीत नरेंद्र मोदी पंतप्रधान बनतील का? या प्रश्नावर स्वामी म्हणाले, हा निर्णय एनडीएमधील इतर मित्रपक्षांवरही अवलंबून असेल. ३० अथवा ४० जागांचे असणारे मित्रपक्ष यांनी समर्थन दिले नाही तर नरेंद्र मोदी पंतप्रधान बनू शकणार नाहीत.जर समर्थन दिलेच तर मोदींच्या जागी नितीन गडकरी हे पंतप्रधानपदासाठी चांगला पर्याय ठरू शकतात. असे झाल्यास मला फारच आनंद होईल. कारण गडकरीही मोदींसारखीच चांगली व्यक्ती आहे. तसेच गडकरी हे पंतप्रधानपदासाठी पात्र आहेत.असेही मत स्वामींनी व्यक्त केले.